मलेरिया होऊन गेल्यानंतर काळजी कशी घ्यावी? कसे पथ्य पाळावे?
उत्तर- मलेरिया किंवा कोणताही ताप येऊन गेल्यावर आपली पचनशक्ती कमी झालेली असते. शरीरात आम साठलेला असतो. त्यासाठी लंघन करावं, मुगाचे कढणं, भाताची पेज असा हलका आहार करावा. आहारात नियमितता ठेवावी, रात्री लवकर झोपावे, विश्रांती व योगासन प्राणायाम करून अधिकाधिक आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.